दलित अत्याचार आणि प्रसारमाध्यमे.

पाण्यासाठी दलितांना जाळणे/मारणे अशा घटना भारतात घडतच असतात. महाराष्ट्र त्याला अपवाद नाही. महाराष्ट्र पुरोगामी असल्यामुळे या घटना तुरळक प्रमाणात घडतात.
सातारा जिल्ह्यात अशीच एक घटना घडली. आणि ती बातमी मला http://www.chennaionline.com/ या संकेतस्थळावर वाचायला मीळाली. इतर ठीकाणी या घटनेचा उल्लेख आहे की नाही हे कळायला मार्ग नाही. मात्र या घटनेने काही प्रश्न निर्माण केले.

१. अशा घटनांना प्रसिध्दी का मीळत नाही?
२. अशा घटना वृत्रपत्रांच्या/प्रसारमाध्यमांच्या दृष्टीने किती महत्वाच्या असाव्यात/आहेत?
३. या प्रकारच्या घटनांना प्रसिध्दी द्यावी की नको? आणि का?

मुळ बातमी इथे वाचा.