डोंबिवलीतून कांदिवलीला जा ना
बोरिवलीतूनी विरारमधि जा ना ..... ध्रु.
दादरामधूनी आता, अंबरनाथला जा ना
कधीमधी येऊनी , भेळपुरी खा ना .... ध्रु.
कुलाबा सोडुनि, जाता का सोपाऱ्याला ?
नाहीतर वांद्रा मोकळे करा ना ...... ध्रु.
कुर्ला आमुचाच आहे, भायखळाही आमुचा
करा की रिकामे, घाटकोपर आता.... ध्रू
गिरगावामधुनी , लवकर हाला ना
अवघ्या चाळी ताब्यात , देउनी पळा ना.. ध्रू
ऐसा मी उपरा, या मुंबईचा राजा
कोणिही येउनि, लुटा इथली मजा...... ध्रु.
("आरंभी वंदीन अयोध्येचा राजा.... " या रामदासांनी लिहिलेल्या व श्री भीमसेन जोशी यांनी गायलेल्या, अभंगाचे हे विडंबन असून , ते त्याच चालीत गाता येईल. ऱ्हस्व दीर्घ त्याप्रमाणे वापरले आहेत. जरूर पडल्यास गातांना त्या प्रमाणे ऱ्हस्व दीर्घात बदल करावेत. हे केवळ मनोरंजनासाठी लिहिले आहे)