आज सकाळी मंडईत गेले होते, तेथे पांढरेशुभ्र मुळे दिसले, घ्यायचा मोह झालाच, कोशिंबीर होइल एक वेळची,
एक मुळा घेतला, तो घेताना भाजीवाला म्हणाला- मागील पाला काढून टाकू का -
म्हटले अरे नको (मनात- भाजी करुयात आज मस्त- आणी नवर्याला ओळखायला
लावुयात,), घेउन आले मुळा घरी, त्याचा पाला काढून स्वच्छ धुतला, बारीक
चिरुन ठेवला, तोपर्यंत हरबरा डाळ भिजत घातली,
अर्ध्या तासाने डाळ चांगली भिजल्यावर कढइ मध्ये जिरे-मोहरी, हिंग, हळद घालून खमंग फोडणी केली,
त्यात भिजलेली डाळ घातली चांगली परतुन घेतली, मग चिरुन ठेवलेली मुळ्याची
पाने त्यात घातली, तिखट व चवीनुसार मिठ घातले पुन्हा परतले व वाफ
येण्यासाठी त्यावर झाकण ठेवले, पाच-सात मिनिटे चांगली वाफ येउ दिली,
त्यातील डाळ शिजल्यावर भा़जी झाली समजावे. पाणी अज्जिबात घालू नये.
ही भाजी केली , ह्यांच्या ताटात वाढ्ली, म्हटले ओळखा पाहू- कशाची भाजी आहे, नाही ओळखली तर
मला आईसक्रिम द्यावे लागेल, बरीच नावे घेतली, पण नाहीच ओळखली.....
आणी त्याबद्दल मला आत्ताच आईसक्रिम आणून दिले आहे, ते खात खात हा पदार्थ दिला आहे
आपणा सर्वांसाठी---
तयार भाजी ही पहा------
पाने चांगली धुवून घ्यावित,
डाळ चांगली भिजलेली असली पाहिजे.
आईकडून
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.