माझे कुणा म्हणावे ...

वैराण वाळवंटी, त्या पानही हलेना

माझे कुणा म्हणावे, काहीच आकळेना
जावे पळून कोठे, हा खेळ प्राक्तनाचा
चिरदाह वेदनेचा, मज दंश साहवेना
ज्याने हलाल केले, कित्येक काफिल्यांना
तो भास मृगजळाचा, नजरेस साहवेना
जी रोज दाविली मी, घनतृषार्त यात्रिकांना
ती वाट मरूस्थळाची, मग मलाच चालवेना
सारेच मानभावी, वस्तीत दांभिकांच्या
जो तो फितुर येथे, सच्चा कुणी मिळेना
(हरिहरन यांनी गायलेल्या 'कोई पत्ता हिले हवा तो चले, कौन अपना है ये पता तो चले' या गझलचा स्वैर भावानुवाद)