मैत्री म्हणून साठवलेल्या
तुझ्यामाझ्या आठवणीचे
आत्ता साल कितवे असेल ?
चिखल करून मातीत
खेलालेया खेळच
आत्ता वय किती असेल ?
दुर् कुठे निघून गेलेल्या
तुला आत्ता मी
फारसा आठवत नसेन
पण कुठल्यातरी सायंकाळी
तुला आपला
लपंडावाचा खेळ आठवत असेन
तू गेल्या नंतर
आमरायीतल्या आंब्याला
मोहोर कितीदा आला
पण तुझ्याशिवाय आंब्याच्या झाडावर
दगड कुणाचा नाही गेला
मैत्री म्हणजे ...
काय असते रे ...
रोज भेटावे
असा आपला हट्ट असतो का रे
नाही ना ??
मग कधीतरी भेटल्यावर
" अजून काय विशेष ? "
यालाच मैत्री म्हणतात का रे ?
सुयोग काळे
©दुवा क्र. १