काही क्षण

जीवनातील काही मस्तवाल क्षण

असे असतात की
उभ्या आयुष्याचे दान करायला
ते तयार असतात
जराशा धुंद, अवीट, वेड्या अनुभवासाठी
पण...
त्यांच्या आगे मागे असलेले
असख्य शहाणे, व्यवहारी क्षण
त्यांना पकडून ठेवायला
सज्जच असतात
मस्तवाल क्षणांचे राज्य 
येते आणि जाते
आणि मन बिचारे
उपाशीच राहते !!!