मन

-मन कितीतरी देशात , भावनेत ,कल्पनेत , असल्या -नसल्या… सगळ्याच गोष्टीच जाऊन अडकत ……
कधीतरी खऱ्या  प्रश्नांची उत्तरंहि  घेऊन परत  हि  येत , तर कधी  न सोडविणारी कोडी घेऊनही समाधान भावनेन  परत येतांना सुखद यातानेन  हि भारावत… 
न आवडणारे क्षण आठवून काहीतरी त्यातूनही शिकवून  जांत  तर पुन्हा -पुन्हा  आठवून  देऊन ,खोडचुका  हि पकडून लक्षांत आणूनही  बरोबरीचे अर्थ  जुळवून  नेत …।
गोड-तिखट  भावनेची  चव जिभेवर रेगांळावी म्हणून रोजच जगलेले क्षण पुन्हा पुन्हा आवडणारे  किंवा  नवडणारे ,पकवानांना वेगळ्याच  रीतीने थापायला  लावंत  हे मन …
क्षणापेक्षाही  कमी वेळ न लावता सगळ्या गोष्टींना वेगवेगळ्या रीतीने,,, वेगवेगळ्या नजरेने बघायला प्रवृत्त करत  ते हेच मन …।
तर कधी नदीच्या प्रवाहाप्रमाणे संथ , नितळ ,शुभ्रं  आणि  हो!!!सगळ्याची तहान भागविता  यावी अश्या आपल्या गुणधर्माला  जपून तृप्तता  मिळवून दयावी असले  विचार करायला  लावणारे  हे मन…
मात्र कशी सावरू  या मनाला ?
कशी युक्त्या खेळवून समाधानाची तहान भागवून तृप्त करू या मनाला?
कुठली  समीकरणे , कुठल्या नियमाने सोडवू या मनाला ?
कुठल्या देशात जाऊन परत आणू या मनाला ?
सुखाच्या ,, दुःखाच्या ,,कि  रागाच्या ,कि ,,शांततेच्या  भावनांना  जन्म  देवून ,,,
मरणाच्या दारावर  जावून परत आणू  या मनाला ???
स्वतःच्या  कल्पनेने  सुंदर  स्वप्नांचे पंख  लावून उडवू सात -समुद्राच्या आणि ब्रम्हांडांच्या  गोल दुनेयेत या मनाला …. ??
कि खिन्न  खंत  असलेल्या आणि सहनशीलता  धारण करून आगळ्या -वेगळ्या  रूपाने  पुह्ना -पुन्हा ,,, रोज -रोज ,,,क्षणो -क्षण
जन्म  देवून रोजच मरण घडवून आणू का या आणि याच  मनाला????

श्वेता मेश्राम
१४/०३/१४
१:०९ शुक्र …