आंबट गोड..

शाब्दिक घाव कितिक ते बसले,

वज्राहूनी अति कठोर अंमळ..

गोड आठवणी संपल्याच जणू, 

अंतरातल्या त्या म्रुदू न चंचळ ..

विषयांचे पेव फुटलेले, 

आणून गेले मनांना भोवळ..

आठवल्या त्या तिक्ष्ण नजरा, 

अन बोचरे उसासे निव्वळ !

घे जवळी चल उडूनी जाऊ 

मनपवनाचा घेऊन वेग..

दरीखोर्याना मागे टाकून

मिटवून टाक ती वेडी भेग..


- पल्लवीसमीर