नाही कुणास जनता मग आवरेल तेव्हा
ते साव चोर होते सारे कळेल तेव्हा
खोडू जुना नव्याने इतिहास एकदाचा
काही नवीन सांगू जे जे पटेल तेव्हा
आता कुणास नाही जर भरवसा कुणाचा
सारे लिहून घेवू मग परवडेल तेव्हा
आहे अशी खुमारी जग चेतवायची जर
होईल काय सांगा ठिणगी पडेल तेव्हा
अंबर उदास होवो कोणास काय त्याचे
इच्छेस मागतांना तारा तुटेल तेव्हा !
गेले पिळून असते ते हृदय सांग माझे
अत्तर असेल बाकी तर दरवळेल तेव्हा !
विलास खाडे