लॉकडाऊननी सगळीकडून बांधल्यासारखं झालंय.
देह, मन आणि काल सगळं बंदिस्त झालं !
मन धावेना, पोलिसांच्या दहशतीनं शरीर जखडलं आणि काल एकाजागी थांबला.
मृत्यूच्या भीतीचं पराकोटीचं थैमान ! मन रमवायचे सर्व उपाय निरर्थक आणि निरस झाले. प्रत्येक शक्यता जन्मताक्षणी संदेहयुक्त झाली.
सगळ्याचा परिणाम शेवटी श्वासावर झालाच !
श्वास अवरुद्ध झाला. काहीही होऊ शकत नाही आणि कोणताही प्रयत्न करणं व्यर्थ वाटायला लागलं.
लॉकडाऊन पुन्हा वाढला !
उरल्यासुरल्या आशा संपल्या. जबरदस्त गर्तेनं सारं अस्तित्व घेरलं.
हाच निर्वाणीचा क्षण होता !
आपल्याला देह नाही, तस्मात मृत्यूही नाही आणि श्वासावर आपलं काहीही अवलंबून नाही.
आपण कायम सर्वव्यापी, अनिर्बध, मुक्त स्थिती आहोत.
लॉकडाऊन आपल्यात आहे, आपण लॉकडाऊनमधे नाही.
तो सिद्ध झाला !