तु आलीस तेव्हा
आभाळ हाताशी आलं होतं,
तु आलीस तेव्हा
माझं स्वप्न खरं झालं होतं.
तु माझ्यावर रुसायची
अन अबोला धरुन बसायची,
मला सुचत नसायचे काय करावे
तेव्हा तु माझ्यावर हसायची.
खरचं ,तु आलीस तेव्हा
सुख मला समझलं होतं,
तुझ्या खांद्यावर डोकं ठेऊन
आयुष्य मला गवसलं होतं.
आठवतात मला ते क्षण न क्षण
जेव्हा माझ्या गात्रात तु उतरली होतीस,
आज ओघळणारा प्रत्येक थेंब सांगतो
तु ,तुझ्या विश्वात परतली होतीस.
तु आलीस तेव्हा असं होतं
तु आलीस तेव्हा तसं होतं,
आता सांगु कसे तुला मी
तु गेलीस तेव्हा कसं होतं......
जयेंद्र..