मंडळी, माझ्या मनातील विचार मला शक्य होते तसे मी कागदावर आणले , चित्तरंजन भट यांनी स्वत:हून माझ्या गजलेत काही बदल केले आहेत. ती रचना इथे देते आहे. (यातील तखल्लुस हा शब्द मला माहिती नव्हता. गजलेच्या जाणकारांनी त्याचा सांगितलेला अर्थ - मक्त्यासाठी वापरण्यात आलेले टोपण नाव हा आहे. )

सखये तुझ्याविना हे जगणे रितेच आहे
हसलो जरी कधी मी हसणे बळेच आहे

आता वळून मागे पाहू नकोस मजला
दुखवून दूर जाणे मज भावलेच आहे

मीही तुझ्यापरी ना आसावलो तरीही
ओठी अजूनही का गाणे तुझेच आहे

आतील वेदनेच्या चेहऱ्यास जाणतो मी
चढवू नको मुखवटा मी पाहिलेच आहे

नावात आपल्या मी मक्ता लिहू कशाला
माझे खरे तखल्लुस गझलेमुळेच आहे