ही वास्तू बांधल्यानंतर पुन्हा एकदा अशा वास्तूची निर्मिती होऊ नये म्हणून तेथे काम करणाऱ्यांचे हात तोडण्यात आले होते असे ऐकले आहे.

ऐकिव गोष्टींवर जाऊ नका.  जगातील सर्वच भव्य वास्तूंसाठी अनेक गुलाम झटतात आणि प्रसंगी त्यांचा जीवही जातो. मागे चीनच्या भिंतीबद्दल सर्वसाक्षींच्या लेखात ती भिंत बांधण्यास कोण कोण झटले त्यावर एक लहान प्रतिसाद टाकला होता. (आता शोधायचा कंटाळा आला.) इजिप्तचे पिरॅमिड, मायन वास्तू इ. इ. गुलामांच्या रक्तात लाल रंगल्या आहेत. आंकोर वटही खूप वेगळे असेल असे वाटत नाही.

एखादी वास्तू आपल्या देशातली आहे किंवा आपल्या धर्माशी निगडित आहे म्हणून ती म्हणून समर्थनाचे आवाहन करणे म्हणजे विशुद्ध मूर्खपणा आहे.

सहमत. आधी अशी सात आश्चर्ये निवडत बसणेच मूर्खपणाचे आहे. पुरातन सात होती त्याऐवजी आता दहा, आठ, झाली तर चालणार नाही का? पर्यटन व्यवसायाला अधिक चालनाच मिळेल.

अवांतर:

संग्राहक,

माझ्या लेखांचे दुवे दिल्याबद्दल धन्यवाद.