शालेय पाठ्यपुस्तकांत शुद्धलेखनाच्या असंख्य चुका झाल्या आणि सुमारे साडेतीन कोटी रुपये किंमतीची पुस्तके रद्दीत काढावी लागली ही बाब उद्वेगजनक तर आहेच. पण छपाई होत असतांना छपाई यंत्रणेतील कोणाच्याही ध्यानात ही बाब आली नाही हे अधिकच उद्वेगजनक आहे. पूर्वी अक्षरांचे खिळे जुळवून खेचकाम पद्धतीने छपाई केली जात असे अशा एका छापखान्यात एक खिळेजुळारी गृहस्थ, लेखक- संपादक आणि उपसंपादक यांच्याही नजरेतून सुटून गेलेल्या शुद्धलेखनातील चुका स्वतः दुरुस्त करीत असत आणि मुद्रित साहित्य अधिकाधिक शुद्ध ठेवण्याची परकाष्ठा करीत. हे मी स्व:ता अनुभवलेले आहे. आता अशी जबाबदारीने काम करणारी माणसे उरलीच नाहीत काय ?