तीन्ही भाग एकदम वाचले. प्रत्यक्ष अनुभवाचे शब्दातून केलेले वर्णन वाचून "बापरे!" हेच शब्द ओठावर आले. छायाचित्रे मात्र आतापर्यंत अदृष्य झालेली दिसतात. त्यांचा दुवा मिळेल काय? मुंबईला येऊ शकणारे वादळ दूर गेले म्हणून त्या वेळेस आम्ही किती आनंदांत होतो?
अनेक वर्षापूर्वी मी एकदा भारतातीलच एका आडगावात गेलो असतांना वादळामुळे असाच तीन दिवस तेथे अडकून पडलो होतो त्याची आठवण झाली. गांवा बाहेरून वीज, पाणी, दूधदुभते, भाजी वगैरे कशा कशाचा पुरवठा नाही, दूरदर्शन, नभोवाणी नाही की दूरध्वनीवरून कुणाशी संपर्क साधता येत नाही. "मरून्ड" या इंग्रजी शब्दाचा नेमका अर्थ त्या वेळेस ध्यानात आला. मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झालेली, रस्त्यात जिकडे तिकडे पाणी साठलेले अशी सगळी परिस्थिती होती.
या निमिताने दोन गोष्टी मनात आल्या. पहिली: श्री गोळे यांनी सांगितल्याप्रमाणे आपणच सुखासीनतेसाठी निसर्गापासून दूर गेलो आहोत. त्याचे परिणाम असे भोगावे लागतात.
दुसरी: जर सुदैवाने अशा प्रसंगातून आपण सहीसलामतपणे वाचलो तर कांही काळानंतर त्यातील दुःखाचा भाग विसरून जातो आणि आपले व्यक्तीमत्व अधिक सशक्त बनते.