पाण्याच्या दुर्भिक्ष्याचे वर्णन हेलावणारे! सगळे काही लवकर सुरळीत होवो अशी मनःपूर्वक आशा करते.
मनुष्य जेवढा प्रगत होतो तेवढाच तो जास्तीतजास्त परावलंबी होत जातो असे दिसून येते.
अगदी मान्य. पण ते चुकीचे आहे असे मला वाटत नाही. निसर्गसन्निध, निसर्गाभिमुख जगण्याचे मलाही आकर्षण वाटते. तरी यंत्रविरहित जगणे जास्त चांगले असेल असे वाटत नाही. उलट वादळासारखी संकटे आदिवासीसारख्या लोकांवर आली तर त्यांचे जगणे कितीतरी अधिक प्रमाणात उध्वस्त होईल. आज दूरचित्रामुळे, महाजालामुळे, शिस्तबद्ध सैन्यामुळे, पाणी वाहून नेणाऱ्या मोठाल्या वाहनांमुळे कित्येकांचे प्राण वाचले असतील. नपेक्षा कोणी मोजदाद न ठेवलेल्या असहाय पक्ष्यांसारखी अवस्था व्हायची माणसाची. यंत्रांनी सोयीच्या केलेल्या आपल्या आयुष्यात असे धक्क्याचे, धोक्याचे क्षण आले तर ते मोठे वाटतात कारण ते अपेक्षित नसतात. अप्रगत स्थितीत पावलापावलाला असे धोके येतील असेच वाटते.