प्राजु,

देश कोणताही असो, पण अशा परिस्थितीमध्ये लोक अतिशय सामंजस्याने वागतात. धर्म, जात, वंश, याचा विचार कोणाच्याही मनास तेव्हा शिवत नाही. आणि इथेच माणुसकी अजूनही जीवंत असल्याचा पुरावा मिळतो .

खरे आहे ते. क्षणभर मनांत विचार येतो, जर तसे नसते तर...? पण सुदैव आपले.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

श्री. अत्यानंद,

पण जगलेत त्यांच्यावर मरणाहून गंभीर असा जीवन मरणाचा प्रसंग आ वासून उभा राहतो.

तरी त्यामानाने आमची परिस्थिती सुदैवाने तितकीशी गंभीर नव्हती. पण दूर-दूरच्या खेड्यांमधून कित्येक जणांनी मृत्यूशी नजर भिडवल्याच्या बातम्या आहेत.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. 

धन्यवाद श्री. विनायक.

रोहिणी,

(अगदी पक्ष्यांचे सुद्धा)  किती हाल झाले असतील याची कल्पनाच करवत नाही.

मुक्या प्राण्यांनी आपली व्यथा कशी मांडावी? पण त्यांनीही नक्कीच अश्रू ढाळले असणार.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

अनु,

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

श्री.सन्जोप राव,

बीबीसीच्या वृत्तानुसार, दक्षिण मस्कतमध्ये पाऊस झाला. पण निसर्गाने रौद्र रूप धारण केले नाही. रूवीत (उत्तर मस्कतात) हवामानात फरक जाणवला नाही. सध्याचे तापमान ४८ अंश आहे.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

श्री. नरेंद्र गोळे,

मनुष्य जेवढा प्रगत होतो तेवढाच तो जास्तीतजास्त परावलंबी होत जातो असे दिसून येते.

नुसताच परावलंबी होत जातो म्हणणे योग्य होणार नाही असे वाटते. प्रगतीच्या वाटेवर आधुनिकतेचे जे फायदे आपण अनुभवतो त्यात अमूल्य वेळेची बचत आणि त्यामुळे अतिरिक्त कृतिशीलता ह्या फायद्याकडे दुर्लक्षं करून कसे चालेल? अधिकाधिक ज्ञान मिळविण्याचे मार्ग आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्याही विचारांची प्रगल्भता प्रगत आयुष्याचे फायदेच आहेत.

आपल्या परिस्थिती चित्रणात वास्तविकता ठसून भरलेली आहे. ते मनोगताद्वारे आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचल्याने आम्हाला चक्षुर्वैसत्यम घडामोडी समजत आहेत.

'मनोगत' हेही प्रगत मानवाचे साधन आहे.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

श्री. अमितराज देशमुख,

भारतात काही काम करण्याजोगे असेल तर जरुर कळवा. तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना मदत करणे सहज शक्य आहे.

उत्तर मस्कतला बीबीसीच्या भाकिताचा तडाखा बसला नाही. आपण पुढे केलेल्या मदतीच्या हाताचा स्वीकार धन्यवादासाठी करतो.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

श्री. शरद गोखले,

अधिकाधिक वाचकांपर्यंत हे अनुभव पोहोचण्याच्या दृष्टीने हे लिखाण एखाद्या मराठी वर्तमानपत्राच्या साप्ताहिक आवृत्तीत अथवा साप्ताहिकात प्रसिद्ध करण्याचा विचार करावा.

आपल्या सुचवणीचा जरूर विचार करेन.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

श्री. आनंदघन,

प्रकाशचित्रे का बरे दिसत नाहीत? तपासून पाहतो.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

श्री. केशवसुमार,

सर्व प्रकाशचित्रे पाहिली. सुंदर आहेत कसे म्हणू? परिणामकारक आहेत.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

मृदुला,

तरी यंत्रविरहित जगणे जास्त चांगले असेल असे वाटत नाही. उलट वादळासारखी संकटे आदिवासीसारख्या लोकांवर आली तर त्यांचे जगणे कितीतरी अधिक प्रमाणात उध्वस्त होईल.

सहमत. संभाव्य वादळाच्या शक्तीचा, मार्गाचा अंदाज दोन दिवस आधीच वेधशाळेस आला होता. त्यामुळेच सर्वांना सावध करण्यात आले होते. सरकारने ४ दिवसांची सुट्टी जाहीर करून घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे जीवितहानी जास्त झाली नाही. हे सर्व 'यंत्रां'मुळेच शक्य झाले. असो.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

श्री. चक्रपाणी,

प्रतिसादाबद्दल .

स्वाती दिनेश,

विषयाची गंभीरता, व्याप्ती माझ्या आवाक्याबाहेरची आहे. खूप पाल्हाळीक होऊ नये अशीही इच्छा होती. त्यामुळे थोडक्यात लिहिले आहे.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

स्मिता१,

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

श्री. हॅम्लेट,

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.