मनातील साऱ्या मुद्द्यांचा सुवर्णमयींने व्यवस्थित आणि सविस्तर उहापोह केला आहे. मात्र त्यांचे शेवटचे दोन मुद्दे सकृतदर्शनी परस्परविरोधी वाटतात. जर जोडणी व्यतिरिक्त प्रशासनाचा समावेश/सहभाग ठेवायचा नसेल तर साहित्य सुपूर्त करण्याची पद्धत प्रशासनाने का ठरवावी? त्याऐवजी संपादक मंडळाने एक याहू वा जी-मेल आय-डी निर्माण करावी व इच्छुक लेखकांनी साहित्य तिथे पाठवावे. असे केल्याने मनोगताच्या साठवणुकीचा अपव्ययही होणार नाही. याहू/गूगलची काळजी आपण करायची गरज नाही, त्यांच्याकडे खूप जागा आहे साठवणुकीसाठी.
मनोगत विशेष म्हणून आजवरचे निवडक साहित्य अंकात घेणे हा मला सर्वात सोपा पण शेवटचा पर्याय वाटतो.