द्वारकानाथ महोशय,

याची गोष्ट वेगळीच आहे ती अशी ---

बाजारात तुरीची प्रसिद्ध गोष्ट आहे त्यावरून ही म्हण निघाली  :-

एक ब्राह्मण बाहेर निघाला होता.  ब्राह्मणीने त्याला येताना बाजारातून तुरीची डाळ आणायला सांगितली.

तो  :  वा तुरीची डाळ आणतो.  घरी आल्यावर डाळ शिजवून वांगी घालून वरण कर.  खूप दिवसात केले नाहीस.

ती  :  छे छे मी आमसुलं घालून आमटी करणार.  त्यांत कांदे घालणार आहे.

तो  :  अग वा ग.  मी सांगितलेले तू काहीच करीत नाहीस.  मला कित्येक दिवसानी वांग्याचे वरण मिळणार म्हणून मी खूष होतो आणि तू आपलंच तुणतुणं वाजवतेस?  काही नाही वांगीच घातली पाहिजेत वरणांत.

ती  :  आले मोठे मला सांगायला कि वांगी घाल म्हणून.  मुळीच नाही.  मी कांदे घालूनच आमटी करणार आहे.

तो  :  उगीच बडबड करू नकोस.  वांगी घालून काय चव येते वरणाला.  माझ्या आईच्या सारखी कर मात्र.

ती  :  डोंबल माझं.  काही चव तरी होती का सासूबाईंच्या स्वयपाकाला!  काहीतरी खूळ घेऊन बसता तुम्ही.  मी मुळीच म्हणजे मुळीच वांगी घालणार नाही.

तो  :  तुझ्या माहेरच्या स्वयपाकाचे काय दिवे लागले होते ते माहीत आहे मला.

ती  :  माझ्या माहेराला नावं ठेवलेली मला खपायची नाहीत.  देवा देवा!! काय पाप केलं आणि या दळभद्री घरांत येऊन पडले.

तो  :  मी दळभद्री काय ग **चे......

असे म्हणून भट भटणीला मारू लागला.

म्हणूनच-----------------

बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी  !!!!!!