तुमचा लेख फ़ार छान झाला आहे. सर्व नामांकित आणि होतकरु कलावंत, विचारवंत मंडळींच्या अगदी आवडीच्या विषयावर तुम्ही अभ्यासपूर्ण विचार करुन सुसूत्र मांडणी केली आहे. 'र्भिन्न  जात, धर्म, संस्कृती यामुळे एकता कशी निर्माण होणार? आपला प्रत्येक प्रश्न हा दुसऱ्यात गुंतलेला आहे. सगळे नवीन योग्य नाही आणि सगळे जुने चांगलेच आहे असेही नाही. पारंपारिक पद्धती आणि नवी विचारसरणी या दोहोंचा मेळ घालणारी, व्यवहारिकतेशी जवळीक साधणारी, मानवी सामंजस्य आणि तारतम्य यावर आधारित त्रिमितीय विचारसरणी ही एक गरज म्हणून समोर आली आहे.' हा तुमचा मुद्दा विचार करण्यासारखा आहे.

तुम्ही ज्याला त्रिमितीय विचार म्हणताय तो मला वाटतं असा विचार की जो रुढ समीक्षेच्या पलिकडे जाऊन केला जाईल आणि व्यापक समाजहिताकरता (शब्द फ़ारच पुस्तकी/राजकारणी आणि बत्तीसच्या काही पटीत चावल्याइतका ओळखीचा आहे, पण इथे मी तो खऱंच मनापासून वापरला आहे) उपयुक्त असेल.

मात्र असा एकच एक 'उपयुक्त' विचार कोणता हा अजून एक प्रश्न आहे, नाही का?