'नेहा' स्वतः दु:खी आहे. तिला विस्कटलेल्या संसाराचे 'दु:ख' हे किती व कसे जाळते ह्याचा अनुभव आहे (असे वाटते). तरीपण ती 'सायली'च्या आयुष्यात दु:खाची जाळपोळ करण्यास आणि त्यांचा संसार उध्वस्त करण्यास उद्युक्त होते, ह्यावरून तिच्या व्यक्तिमत्त्वातही उथळपणा कसा भरभरून वाहतो आहे, हेच जाणवते.

एक कथा म्हणून मला त्यात गैर वाटले नाही. अमेरिकेत प्रेमात/ लग्नात 'रिबाउंड' अशी एक संज्ञा वापरली जाते. (अमेरिकन इंग्रजीत, 'एक्सवायझी इज ऑन रिबाउंड' असे म्हटले जाते.) यात प्रेमभंग किंवा डिवोर्स झालेली व्यक्ती इंस्टंट आधार शोधण्यासाठी खूप चुकीचा निर्णय घेण्याची शक्यता असते. समोरच्याचा सारासार विचार सोडाच परंतु अशी व्यक्ती स्वतःचेही चांगले वाईट या काळात जोखू शकत नाही.

एक उदाहरण म्हणून द्यायचे झाले तर 'अर्थ' आणि 'आखिर क्यों' यासारख्या मोडलेल्या घरे, फसवणूक, दुसरे लग्न इ. विषयांवरील चित्रपटात काम करणारी अतिशय गुणी अभिनेत्री स्मिता पाटील हीचे व्यक्तीमत्व पाहा. ते कोणत्याही प्रकारे उथळ दिसत नाही तरीही ती राज बब्बरसारख्या दोन मुलांच्या विवाहीत बापाशी लग्न करून मोकळी होते. तिने कोणताच सारासार विचार केला नसेल का? बरीच माणसे आपल्या जीवनातील ताण मोकळा करण्यासाठी असे टोकाचे निर्णय घेतात त्यात कोणतेही नाविन्य नाही.