प्रेमभंग किंवा डिवोर्स झालेली व्यक्ती इंस्टंट आधार शोधण्यासाठी खूप चुकीचा निर्णय घेण्याची शक्यता असते. समोरच्याचा सारासार विचार सोडाच परंतु अशी व्यक्ती स्वतःचेही चांगले वाईट या काळात जोखू शकत नाही.

हं! मुद्दा पटला आहे.

एक उदाहरण म्हणून द्यायचे झाले तर 'अर्थ' आणि 'आखिर क्यों' यासारख्या मोडलेल्या घरे, फसवणूक, दुसरे लग्न इ. विषयांवरील चित्रपटात काम करणारी अतिशय गुणी अभिनेत्री स्मिता पाटील हीचे व्यक्तीमत्व पाहा. ते कोणत्याही प्रकारे उथळ दिसत नाही तरीही ती राज बब्बरसारख्या दोन मुलांच्या विवाहीत बापाशी लग्न करून मोकळी होते.
अभिनेते आणि अभिनेत्र्या ह्यांच्या बद्दल जे जे 'छापून' येते ते पाहिल्यावर प्रेम आणि लग्न ह्या विषयात त्यांना विशेष अधिकार बहाल केले आहेत असे जाणवते. सर्वसामान्यांचे नियम त्यांना लागू होत नाहीत. नाहीतर सलमान खान, विवेक ऑबेरॉय इत्यादींनी हाताळल्यावर अभिषेकने ऐश्वर्याशी लग्न का केले असते? गहिऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या अमिताभचे रेखा बरोबरीच्या संबंधांचे किस्से का कानी यावे? असो.
एखाद्या स्त्रीने आपल्या नवऱ्याशी विभक्त होऊन दुसऱ्या पुरुषाशी लग्न केल्याची उदाहरणे कमी नाहीत. पण अद्वैतचे लग्न सहाच महिन्यांपूर्वी झाले आहे ह्या पार्श्वभूमीवर नेहाचे अद्वैतवर खरे मनापासून प्रेम असेल तर ती त्याला असे वागू देणार नाही. त्याला असे वागण्यापासून परावृत्त करेल. पण शारीरिक ओढ (प्रेम नव्हे) माणसाला 'डेस्परेट' बनविते. 'कामातुराणांम न भयम् न लज्जा'.

राज बब्बरशी होण्यापूर्वी स्मिता पाटीलचे दुसऱ्या कोणाशी लग्न झाल्याचे मला माहीत नाही. पण राज बब्बरचे लग्न होऊन बराच काळ उलटला आहे. त्याच्या वागण्याचे मी समर्थन करीत नाही पण आपल्या लग्नातील, पती-पत्नी संबंधातील फोलपणा त्याच्या लक्षात येण्याजोगा काळ उलटला आहे. आपल्या जीवनसाथीला (पटत नसल्यास) समजविण्याचा/समजण्याचा काळही उलटून गेला आहे. लग्नापासून ६ महिन्यात घडलेल्या ह्या घटना नाहीत.
आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील दुःखांचा पाढा वाचून एखादा पुरूष एखाद्या स्त्रीच्या संवेदनाशीलतेचा फायदा उठवू शकतो. त्याच्या दुःखावर फुंकर घालणारी स्त्री, कधी-कधी तिच्याही नकळत जाळ्यात अडकली जाते. त्याला सर्व सुख देण्याच्या नादात सर्वस्व (स्वखुशीने) हरवून बसते. पण, अद्वैत-नेहा मध्ये असे घडलेले दिसले नाही. अद्वैतचे नेहाकडे आकर्षित होणे ह्याला भावनिक आधार नाही (अद्वैत-सायलीतील मतभेद कथानकात कुठे आलेले नाहीत),असे मला वाटते.
कितीतरी पुरुषांच्या लग्ना आधीच्या मैत्रिणी असतात तसेच स्त्रियांचे मित्र असतात. त्या सर्वांनी विचार करावा. आपल्या संसारात कुठल्याही गंभीर समस्या नसताना आपल्याला लग्नाआधीच्या मित्रांचे/मैत्रिणींचे आकर्षण (स्वतःचा संसार मोडण्याइतके..) वाटते का? मला नाही वाटत कोणाचे उत्तर 'हो, वाटते' असे असेल. ह्याला कारण पतीशी/पत्नीशी  कितीही भांडणं झाली/वादविवाद झाले/अबोले झाले तरी संसारातील भावनिक गुंतणूक दोघांनाही एकत्र बांधून ठेवते.
हे सर्व अद्वैत बद्दल झाले. नेहा बाबत आपला मुद्दा मी स्वीकारला आहेच.

असो.