अं.....शरीर हे मनाचं 'मिडियम ऑफ एक्सप्रेशन' असं काहीसं मला वाटतं. शारीर कृती ही एकटी, 'आयसोलेटेड' नसते, तिच्याकडे मनाच्या संदर्भांशिवाय पाहूही नये.
मनाच्या संदर्भाशिवाय मी पाहतही नाहीए. पण मनाचा हा संदर्भ 'प्रेम भावनेचा' नसून 'वासनेचा' आहे. तासाभरापूर्वी पत्नी सोबत रत झाल्यावरही जर स्वप्नात दुसऱ्या स्त्री सोबत शरीर स्पर्शातून विर्यपात होत असेल तर ते अनैसर्गिकही आहे.

म्हणूनच माझी सायली 'निर्णय' घेते, ते तिला आपल्या नवऱ्यात आणि त्याच्या मैत्रिणीत जे घडलंय ते कळल्यावर. नवऱ्याचं मन कुणीकडे चाललंय ते तिला कळलेलं असतं, पण जेव्हा नवरा स्वतःहून ती शारीर कृती करतो, तेव्हा त्यानं सीमारेषा ओलांडल्या आहेत अशी सायलीची धारणा होते.
सायलीने आधीच सावध व्हायला हवे होते. प्रत्यक्ष कृती घडेपर्यंत वाट का पाहावी? पहिल्याच दिवशी आपल्या घरी आलेली नवऱ्याची मैत्रीण रात्रभर गप्पा मारत बसते आणि सायली बेडरूम मध्ये जाऊन निजते? कथा भराभर पुढे नेण्याच्या प्रयत्नात स्त्रीच्या (किंवा पुरुषाच्याही) स्वाभाविक प्रतिक्रियांचा विचारही केला नाही. त्यामुळे सायलीचे कृत्य (बेडरूम मध्ये जाऊन निजणे) आत्मघाती वाटते. तसेच नेहाही, मित्राची पत्नी संभाषणात भाग न घेता बेडरूम मध्ये जाऊन निजली, ह्याला विशेष महत्त्व देत नाही. तिचे ते वागणेही स्वाभाविक प्रतिक्रियांच्या विपरित आहे.

 ह्या दोन्ही गोष्टींमागचे, आणि सायलीच्या ''जर तुझ्या मनात तीच होती, तर माझ्यासोबत जगलेल्या रात्रींचं काय? ....दिवसा ऑफिसमध्ये नेहा, आणि रात्री सायली...' ह्या वाक्यांमागचेही माझे विचार वर दिल्याप्रमाणे आहेत.

सायलीने असे म्हणायला हवे होते 'तुझ्या मनात तीच होती तर माझ्या आयुष्यात का आलास? (रात्रीचा संदर्भ नको). ऑफिसमध्ये नेहा आणि घरी सायली...(रात्रीचा संदर्भ नको).'

असो. तुम्ही एका वेगळ्या पातळीवर लेखन केले आहे, मी एका वेगळ्या पातळीवरून ते वाचले. जसे कथानकातून तुम्ही तुमचे विचार माझ्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे तसा प्रतिसादातून मी माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. 

राग नसावा.