पुन्हा एकदा गोष्ट वाचली व नंतरचे प्रतिसाद.

सहाच महिन्यांच्या समाधानी संसारातून एकाएकी 'मन' उडून जुन्या पण नव्याने भेटलेल्या मैत्रिणीकडे धावावे हे अनाकलनीय वाटते.

सहाच महिने झाले असल्याने भावनिक बंध अजून तितके घट्ट, सशक्त झाले नसावेत असे समजायला वाव आहे. रोजच्या आयुष्यात सुखी असला तरी 'प्रेमात पडण्याचा', आणि त्या प्रेमाला प्रतिसाद मिळण्याचा अनुभव अद्वैतला हवाहवासा आहे. 'नेहा' या स्वप्नातल्या सुंदरीने त्याचा आधार मागावा, त्याच्यावर विश्वासावे, त्याच्या प्रेमात पडावे, या नशेतून तो बाहेर येऊ शकत नाही. त्याच्या आईला तो सांगतो तसे तो इतका आनंदी आहे की तो आणखी कुणाचा विचारच करू शकत नाही.

आणि समजा त्याने सायलीचा विचार करून नेहापासून लांब रहायचे ठरवले तर दुःखी कोण होणार? तो स्वतः! सरासरी माणसे स्वतःच्या सुखाला पहिले प्राधान्य देतात. त्यामुळे अद्वैतचे वागणे अजिबात 'वेगळे' वाटत नाही.