अशी साहित्यिक बांडगुळे जी बहुमूल्य वेळेचे शोषण करतात, त्यांची वेळेच तिरडी बांधून सगळ्यांचा वेळ वाचवणे महत्त्वाचे आहे.
कोणास कविता प्रसिद्ध करण्यापासून असे अडविता येणे शक्य होईल असे वाटत नाही. मनोगत वर लेख, कविता तारांकीत करण्याची व्यवस्था केल्यास कवितेची लोकप्रियता कळू शकेल. पण एख्याद्यास एखादी कविता दर्जेदार वाटत नसेल आणि बहुसंख्य इतरांस वाटत असेल तर नाईलाज आहे. काहींना चारोळ्या आवडतं नाहीत, काही डोक्यावर घेतात. सुरेश भटांनी चं.गों. वर केलेली टीका आठवते आहे, त्याबरोबरच त्याकाळी शाळा-कॉलेजात चारोळ्यांची लोकप्रियताही आठवते आहे. कालपरत्वेही आवडीनिवडी बदलू शकतात. शालेय जीवनात 'सलाम' बद्दल असं वाटत होतं की असले घाणेरडे शब्द वापरून असं कसं कोणी दर्जाहीन साहीत्य लिहू/प्रसिद्ध करू शकतं? नंतर वाटू लागलं की सत्तरच्या दशकातलं रडगाणं आहे, आता वाटतं की समाजाची सद्य परिस्थिती काही फार वेगळी नाहीये.
किंवा त्यांच्या वर संस्कार करणे आवश्यक आहे.
हे कसे करणार? कोण ठरवणार चांगले वाईट काय ते? पुन्हा नवविद्रोही वैगेरे तयार होणार, पुन्हा तेच ते परत परत.