मला वाटते आपणास माझा मूलभूत मुद्दा एकतर कळला नसावा किंवा कळला असल्यास आपण त्यास बगल देत आहात.
मलाही वरील प्रमाणे म्हणता येते. पण वादाला वाद वाढवायचा नाही म्हणून तसे म्हणत नाही.
"समाजमान्य नीतिमूल्ये" हयातभर जपणाऱ्यांचेच चित्रण साहित्यात करावे काय? हे गृहीतक मान्य केल्यास सारे साहित्य हे साने गुरुजींच्या "गोड गोड गोष्टी" आणि " श्यामची आई " छाप होईल. (या दोन कलाकृतींना कमी लेखण्याचा उद्देश नाही पण जगात या पलीकडेही बरेच काही आहे हे विसरून चालत नाही).
सारे साहित्य राहू दे बाजूला. ते सर्व वाचण्याइतके आयुष्य माझ्याजवळ तरी नाही. फक्त 'मनोगता'वरील साहित्य वाचले तरी श्री.साने गुरुजी आणि श्री. लेखकु ह्यांच्या मध्ये, मागे, पुढे अनेक लेखक आणि त्यांची लेखनशैली आहे हे सहज जाणवेल.
"स्वाभाविक प्रतिक्रियां" चे म्हणत असाल तर ज्यांना आपण वर्षानुवर्षे ओळखतो तेही वेळप्रसंगी कधी कधी असे वागतात की आपण अचंबित होतो. मानवी मनांची गुंतवळ समाजमान्य नीतिमूल्ये आणि स्वाभाविक प्रतिक्रिया यांच्या ढोबळ फणीने दर वेळी विंचरता येत नाही.
वाक्य चांगले आहे.
माणसे चांगली असतात, वाईट असतात, भली असतात, विकृत असतात, मनाने खंबीर असतात, कमकुवत असतात. आयुष्यात हरघडी समोर येणाऱ्या प्रश्नांना , समस्यांना सगळेच आपणास अपेक्षित असलेली "स्वाभाविक प्रतिक्रिया" देत नाहीत. त्या माणसांच्या/पात्रांच्या प्रतिक्रिया, त्यांचे वागणे आपणास आपल्या conditioning मुळे, आपल्यावर झालेल्या उत्तम संस्कारांमुळे न रुचणे समजता येते पण जेव्हा त्यास आपण"न पटणारे" म्हणता तेव्हा (मी पहिल्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे) आपण आपले विचार त्या पात्रांवर लादत आहात हेच जाणवते.
त्या पेक्षा कथेतील पात्रांचे वागणे 'तसे का आहे' ह्याच्या स्पष्टीकरणाची अपेक्षा वाचक लेखकाकडून करतो आहे असे आपल्याला का वाटत नाही? पुन्हा सांगतो. प्रियालींनी दिलेले स्पष्टीकरण मला पटले, ते मी स्वीकारले, ही वस्तुस्थिती आपण दृष्टीआड का करता आहात? ज्या प्रमाणे लेखक त्याच्या अनुभवविश्वावर विसंबून एखादे लेखन करतो त्याच प्रमाणे वाचक त्याच्या अनुभवविश्वावर विसंबून कथेतल्या भल्या-बुऱ्या मुद्द्यांचा विचार करतो. दोघांचाही तो हक्कच आहे. 'तुम्ही असे का लिहिले' असा जाब मी लेखकाला विचारलेला नाही,माझे मत व्यक्त केले आहे. जर मला पटले नसेल तर तसे प्रामाणिकपणे लिहिणे गैर आहे का? खुद्द लेखकानेही तसे सुचविलेले नाही.
या कथेतील अद्वैत हा विवाहित असूनही लग्नानंतर सहा महिन्यात दुसऱ्या स्त्रीच्या प्रेमात पडतो, तिच्याशी विवाहबाह्य संबंध प्रस्थापित करतो. तो आपल्या सुखापुढे बाकी साऱ्या गोष्टी क:पदार्थ समजतो, तो नि:संशय स्वार्थी आहे, आत्मकेंद्रित आहे. पण तो असा आहे म्हणून ही कथा आहे!
आणि म्हणूनच ही चर्चा आहे. बरोबर आहे नं. चर्चा तेव्हाच होते जेंव्हा दोघांजवळ भिन्न मुद्दे असतात नाहीतर काय नुसते अभिनंदन करून मोकळा झालो असतो.
तो तसा नसता, तो एक प्रेमळ व निष्ठावान पती असता तर लेखकुंने काय गोष्ट लिहिली असती?
मनुष्य स्वभावात स्वार्थी, आत्मकेंद्रित किंवा प्रेमळ आणि निष्ठावान हिच दोन वैशिष्ट्ये असती तर ..हो लेखकुने हेच लिहिले असते..."अद्वैत व सायली यांचा विवाह झाला व ते सुखाने नांदले" "And they lived happily ever after"!
राहता राहिला प्रश्न "रात्री" व "हाताळणे" याचा तर भावनातिरेकात प्रक्षुब्ध झालेली माणसे शब्द तोलून-मापून वापरण्याच्या मनस्थितीत नसतात. जितक्या सहजतेने आपण "हाताळणे" हा शब्द वापरला आहे तितक्याच सहजतेने कथालेखकाचे ते वाक्य आले आहे. मला तरी लेखकुंचे संवाद नैसर्गिक वाटतात.
माझ्या प्रमाणेच आपल्यालाही मताधिकार जरूर आहे.
माझ्याकडून हा विषय संपलेला आहे. ह्या पुढील चर्चा आपणास आवश्यक भासत असल्यास आपण व्य. नि. द्वारे चालू ठेवू. उगीच इतर मनोगतींच्या वेळेचा अपव्यय नको.