>>>हे भाग पाडणं महत्त्वाचं ते घडतं तेव्हाच कविता खरी असते नाहीतर बाकीचा शब्दखेळ..
आपलं म्हणणं पटलं. पण भाग पडणं हाच दर्जेदार कवितेचा निकष होवू शकत नाही. जर असं असतं तर व्यवसायिक कवींना कविता करणं अशक्यच झालं असतं. परंतु दर्जा राखला जावा हे खरं. माझ्या मते कवितेचा दर्जा व्यक्तिसापेक्षच राहील. तरीदेखील माझ्या अपेक्षेत बसणाऱ्या दर्जेदार कविता खूप कमी बघावयास मिळतात मनोगतावर. मनोगतावर जे प्रथितयश कवी आहेत त्यांच्या कविता वेगळ्या प्रभागात छापल्या तर कदाचित त्यांना जास्त वाचक लाभतील. पण प्रथितय्श कोण हे ठरवणार कोण?