प्रभाकरपंत,

आपल्या पूर्ण तपशीलवार कृतीने तोंडाला पाणी सुटले.  आपण खूपच बारकाईने लिहिले आहे.  काही गोष्टी नव्या कळल्या त्याबद्दल विशेष आभार.

१-२ विचार (कॉमेन्ट्स - सूचना नव्हेत)

आमच्याकडे भाज्या (त्यांत बारीक उभे चिरलेला कांदा सुद्धा) आणि काजू तेलात तळून बाजुला ठेवतात.  नंतर पुलाव वाढताना त्यात मिसळून वाढायची प्रथा आहे.

कित्येक वेळेला मसाल्याचे बरेच पदार्थ (थोडे प्रमाण वाढवून) एका पुरचुंडीमध्ये बांधून, ते पुलाव पहिल्यांदा शिजत असता त्यांत घालतात.  नंतर जेव्हा पुलाव पसरून ठेवतात तेव्हा ती पुरचुंडी काढून टाकली की मसाल्याचा वास सर्वत्र लागून मसाल्याचे पदार्थ तोंडात येत नाहीत.

(भोजनभाऊ) सुभाष