आठवणी नक्कीच जाग्या झाल्या. माझ्या मनातली काही आठवणीही वेगळ्या आहेत. दिवाळीच्या सुट्टीत ठाण्याला मामाकडे गेलं की त्याच्या नौपाड्यातल्या त्या घराच्या परिसरात ड्रेनेज फुटल्याचा वास यायचा. त्या वासातही वेगवेगळे वास मिसळलेले असल्याने म्हणा किंवा काय पण तो वास वेगळाच वाटायचा. मामा किंवा त्याच्याशी निगडीत काहीही आठवले की हटकून तो वास येतो. याच मामाच्या घरी दिवाळीच्या दिवसांत फटाक्यांचा येणारा वासही आठवतो. खेड्यातून आलेलो आम्ही एवढे फटाके कधी उडवलेलेच पाहिले नसायचे. त्यांचा तो एकत्रित वास घ्यावासा वाटायचा. आजही तसा वास आला की ती आठवण येते.