प्रतिसादाबद्दल सर्वांचे अनेक आभार.

प्रीती दी, तुमच्या प्रश्नावर मी अनुने दिलेले उत्तरच पुन्हा देईन. 'प्रेमभंग' अशासाठी म्हटले आहे की बरेचदा अशी मनस्थिती,परिस्थिती प्रेमभंगानंतर येतेच की जिथे तो/ती नसल्यावर आपण काय करावे असा प्रश्न पडतो. आणि दु:खी राहिल्याने समोरच्या किंवा बाकीच्या लोकांसही काही फरक पडत नाही.अशावेळी आपण आपल्यावरचं प्रेम कायम ठेवलं तरच आला दिवस आनंदाने जगता येतो, असा माझा अनुभव आहे.

हा लेख लिहिताना माझ्या मनात अनेक विचार होते.त्यापेकी काही असे:

१. "कोणतंही दु:ख कायमस्वरुपी नसावं असं वाटतं. हळूहळू खपली भरत जाते."

२. "सकारात्मक विचार."जाणारा गेला, आपण का खंगत बसावे?"

३. "माणसाची सर्वात प्रिय व्यक्ती म्हणजे तो / ती  स्वतःच!"

४. राहुलने म्हटल्याप्रमाणे, जुन्या मित्रांपासून दूर गेल्यावरही दु:ख वाटत राहतं पण नवीन ठिकाणीही आपण हळूहळू रुळतोच की.

वेगवेगळ्या प्रतिसादातून माझे विचार स्पष्ट झाल्याचा खूपच आनंद वाटतोय. पुन्हा एकदा धन्यवाद.

-अनामिका.