काही वर्षांपूर्वी मुंबईच्या चर्चगेट स्टेशनसमोरच्या मुख्य रस्त्यावर निर्मला पाठक या महिलेला वाहतूक नियंत्रण करताना अनेकांनी पाहिले असेल. एक समाजसेवा आणि समाजाच्या गरजेचे काम आपण करतो आहोत, अशी त्यांची भावना होती. दररोज तेथून येजा करणाऱ्यांना त्यांच्या शिट्टीची एव्हढी सवय झाली होती, की एखाद्या दिवशी त्या दिसल्या नाहीत, तर अस्वस्थ होऊन पोलिसांकडे चौकशी करणारे अनेकजण मी पहिले आहेत. आपल्या सेवाभावी व्रुत्तीने लोकांशी जिव्हाळ्याचे नाते जोडण्याचा छंद त्यांना होता. ह्याला फौजदारी म्हणावे का?