जर माणसांना सार्वजनिक ठिकाणी कसे वागावे ह्याचे तारतम्य नसेल तर 'फुकट फौजदार' निर्माण होतात. आपल्या देशात वाहतुकीचे नियम नावाचा प्रकार अस्तित्वात नाही. म्हणूनच जगात सर्वाधिक अपघात आपल्या देशात होतात. अशा वेळी ९९% लोक मूकपणे जे चालले आहे ते बघत असतात. ह्याचा अर्थ त्यांची याला संमती असतेच असा नाही पण या ना त्या कारणाने त्यांना ह्यात सहभाग घ्यायचा नसतो. बाकी लोकांमध्ये काहींना परिस्थिती बदलावी असे वाटते आणि ह्यासाठी ते प्रसंगी इतरांचा रोष पत्करून (तुला काय घेणं आहे?) परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतात.

दुसरे उदाहरण. जपानमध्ये गाडीच्या हॉर्नचा आवाज ऐकू येत नाही. रहदारीच्या रस्त्यवार देखील सर्वकाही सुरळीत चालू असते. तिथे फुकटचे तर सोडाच, नेहेमीचे फौजदारही दिसत नाहीत. कारण प्रत्येकाला आपापल्या जबाबदारीची जाणीव असते.  

शेवटी वाहतुकीचा बट्ट्याबोळ झालेला असताना मूकपणे बघत रहायचे की परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कारण शेवटी आपल्या देशात लोकशाही आहे.

हॅम्लेट