मात्र बहुधा मुशाफिरी शेवटाकडे येतेय असे मात्र राहून राहून वाटतेय आणि पुढे काय ? असाही प्रश्न पडला आहे.

सगळ्या चांगल्या गोष्टी लवकर संपून जातात तशी ही अनुभवमालिकाही संपणार आहे, ह्याचे वैषम्य वाटते आहे खरे. पण आता आपणच अरुणांना असेच अजून लिहीते ठेवण्याचे कामही चोख कराल अशी आशा बाळगतो.

ते वारीलाही गेले होते एकदा, असे अलिकडेच वाचले. तेव्हा बघा त्यांना त्याबद्दल लिहीण्यास सांगून. कोण जाणे, अजून अशीच एक संपन्न मालिका जन्म घेईल! त्यांच्यापाशी खोल अनुभव आहेत, व ते मोजक्याच पण प्रवाही शब्दात, आणि अचूक संवादांसकट सांगायची हातोटीही आहे. तेव्हा असेच काही ते पुढे चालू ठेवतील अशी अपेक्षा करतो.