अत्त्यानंद, विसुनाना, प्रदीप आणि अन्य अनेक रसिक वाचक.
नमस्कार.

मुशाफिरीवरील आपल्या प्रतिक्रियेबद्धल  आभार.
माझ्या लेखनशैलीचे तुम्ही, तसे अनेक अन्य मनोगतींनी जे कौतुक केले त्याने मी भारावून गेलो आहे. तसा मी हडेलहप्पी माणूस. साठीच्या उतारावर आयुष्यात प्रथमच लेखन केले. लेखनासाठी लागणारी प्रतिभा मजजवळ मुळीच नव्हती, अजूनही नाही. त्यामुळेच  वातावरण निर्मिती वगैरे लालित्य जमणे कठीणच. आणि म्हणून मी स्वानुभवच लिहिणे ठरवले. इथेही स्वानुभावाचे वस्तुमान तसे भरपूर असले  तरी ते खूपसे विस्कळित स्वरूपात होते. या घटना १९८१-८३ या काळातल्या आहेत. त्यामुळे स्मृतिपटलावर जसे आणि जितके सांपडले तितके, थोडे वास्तव थोडे कल्पित, असे लिहीत गेलो.

नव्याने गाडी चालवायला शिकणाऱ्यासारखी गत झाली. गाडी कशी बंद करावी, कुठे थांबावावी ते समजेना. मग इंधन संपे पर्यंत गाडी चालवावयाचीच, मात्र अपघात होऊ न देता, असे ठरवले. आता मात्र इंधन संपत आलेय. ही गाडी बंद झाल्यावर कदाचित् दुसरी गाडी चालवायला घेईन. असो.

कळावे. असाच लोभ असो द्यावा ही विज्ञापना.

हरून - अरुण वडुलेकर