'हरुन' वडुलेकरांच्या मुशाफिरीतून आणि त्यांच्या वरील निवेदनातून त्यांच्यातला एक अत्यंत कार्यतत्पर, सुसंस्कृत आणि नम्र माणूस दिसत रहातो. लेखनाचा हा त्यांचा पहिलाच प्रयत्न असे ते म्हणतात, पण ते तसे कुठेही जाणवत नाही. मुळात माणूस सच्चा असला आणि अनुभव जिवंत असले की लेखन आपोआपच अभिनिवेशरहित आणि प्रांजळ होते हेच वडुलेकरांच्या लिखाणातून दिसते.
'मनोगत' वरील दीर्घकाळ लक्षात राहील अशा लिखाणात या मुशाफिरीचा समवेश असेल याबाबत मला शंका नाही. मराठी संकेतस्थळांवर चालणारे उथळ आणि बटबटीत वाद, चर्चा आणि कंपूबाजी या पार्श्वभूमीवर वडुलेकरांचे हे लिखाण आधिकच उठून दिसते.