मी रुईयाला होतो तेव्हा कॉलेजचा मराठी विभाग अत्यंत चांगल्या, नावाजलेल्या प्राध्यापकांनी शोभित असा होता. प्रा. वसंत बापट, प्रा. सरोजिनीबाई व प्रा. पुष्पाबाई भावे! माझा मराठी हा विषय नव्हता, पण तिकडचे विद्यार्थी भारावून त्यांच्याबद्दल सांगायचे, आणि मराठी वाङ्मय मंडळाचे कार्यक्रम ह्या मांदियाळीने सुशोभित केले असायचे.
अजून एक कुणीतरी, आपल्या सुगंधी दिवसांशी निगडित असलेलं आता कायमचं निघून गेलं आहे. ईश्वर त्यांना सद्गती देवो.