गझल ठीक आहे पण

फ़ुलांना जर असे आहेच कोमेजायचे
कशाला जीव लावुन ताटवे फ़ुलवायचे

छान पण लावुन चूक त्यामुळे शेर खारीज ठरतो.

कशासाठी पसारा मांडला तू एवढा
तुला आहेत सारे सूर्य जर विझवायचे

ह्म. पसाऱ्याचा सूर्य विझवण्याशी संबंध स्पष्ट होत नाही.

पुन्हा भिजलो न मी भिजलो मिळुन दोघे जसे
विसरले मेघही नंतर तसे बरसायचे

वरच्या ओळीत फार ओढाताण झाली आहे. खालची ओळ आणि एकंदर शेर बरा.

विचारे सारखी येऊन आठवणीत ती
किती वेळा ठरवले तू मला विसरायचे

वरची ओळ वृत्तात नाही त्यामुळे शेर खारीज ठरतो.

नको पाहू अशी तू एकटक माझ्याकडे
तुझ्या डोळ्यात माझे गीतही हरवायचे

पाहू आणि डोळे ठीक. गीताचा काय संबंध?

'पुन्हा भेटू' जरी म्हटले निरोपाच्या क्षणी
उमजलो मी पुन्हा नाही कधी भेटायचे

छान. मी उमजलो की मला उमजले? समजलो मी चालेल.

सदा माझे तुझे माझे तुझे माझे तुझे
अमीबांचे कधी या विश्व विस्तारायचे

ठीक.

तुला बघताच माझी गझल बोलू लागते
मला नाहीच जमले पण कधी बोलायचे

गझ्ल असे वाचायचे का? चूक. वरची ओळ खारीज. बोलायचे की बोलायला? शेर ठीक.