एकंदर अन्त्ययमक चांगले निभावले आहे. तुम्हाला गझलेची चांगली तबीयत लाभलेली आहे असे दिसते. जवळपास सगळेच शेर आणि कल्पना आवडल्या.


मात्रा सांभाळले असल्या तरी लय जाते आहे.
राधिका, ताराप गा, ताराप गा
गालगा, गागालगा, गागालगा
असे किंवा
यमाचा, राधिका गा, राधिका गा
लगागा, गालगागा, गालगागा
ह्या पैकी कुठले तरी एक शेवटपर्यंत नीट सांभाळायला हवे होते. असो.

जवळपास प्रत्येक ओळीत वेगळे वृत्त आहे. आणि मात्रावृत्त म्हणून विचार केला तर लयीत म्हणता येत नाही. लिहिता लिहिता आणखी सफाई येईल. लिहीत राहावे हाच उपाय.