कवितेतील भाव अतिशय आवडले.. अतिशय चांगला कल्पना विलास आहे..
 एकेक लाट मज येते सांगत काही
"या वाळूवरले घर टिकणारे नाही"!
ओहटी अशी रांगोळ्या घालत जाते
लोण्यासम ही पुळणच पायी रुतते

कधी समुद्रपक्षी निरोप घेउन येती
आशाचक्राची गती वाढवत जाती

मज साद घालती विजा वादळे होड्या
पण पायी माझ्या मणामणांच्या बेड्या

वाटते भरावा शिडात फिरुनी वारा
मी पळून जावे तोडुन इथली कारा
.. आवडले
-मानस६