गांधी ह्या विषयावर मनोगतावर आधीही खूप उलट-सुलट चर्चा झालेली आहे. गांधी म्हणजे कोणी परमेश्वर नव्हते. वेगवेगळी आंदोलने पुकारायची. अनेक अनुयायांनी गांधीजींच्या तत्त्वांवर विश्वास ठेवून आंदोलनात भाग घ्यायचा, घरदार विस्कटवून टाकायचे, प्रसंगी प्राणार्पणही करायचे आणि गांधीजींनी आंदोलन मागे घ्यायचे. असे त्या काळात अनेकदा घडले होते असे पुस्तकांमधून वाचावयास मिळते. गांधींचे गोडवे सगळेच गातात. पण सर्वसामान्यांप्रमाणे गांधीजीं मध्येही गुण-दोष होते. त्यांच्या दोषांवर कोणी बोट ठेवल्यावर कोणी कितीही राग-राग केला तरी सत्य बदलणार नाही. आपल्या नेत्याचे दोषही आपण जाणून घेतले तर पुढच्या पिढीच्या नेत्यांना ते टाळून अजून परिपूर्ण नेतृत्व देता येईल असा विचार आपण सुशिक्षित, सुबुद्ध नागरिक का करू शकत नाही? 
दुसरे, नेताजी आणि गांधीजी ह्याच्या विषयी जे काही वाचन मी केलेले आहे त्यातून मला असे जाणवले की काँग्रेस मधील गांधीजींचे स्थान, त्यांची पक्षावरील पकड त्यांचा नेताजींना होणारा विरोध ह्या सर्व गोष्टींचा अपरिहार्य परिणाम म्हणून नेताजींना वेगळी चूल मांडावी लागली. जवाहरलाल नेहरूंनी 'काँग्रेस मध्ये राहूनच तुझे 'हित' आहे' ह्या आपल्या वडिलांच्या  सल्ल्यावर विसंबून नेताजींची साथ सोडली. त्याचे बक्षीसही त्यांना स्वतंत्र भारतात, इतर अनेक नेत्यांचा विरोध असूनही' गांधीजींनी बहाल केले. पुढे नेहरूंच्या चुका काश्मीरच्या रूपात भारताने भोगल्याच.
मला इतकेच म्हणायचे आहे. नेते मंडळीही चुकतात. स्वत:च्या मोठेपणाच्या कल्पनांमध्ये इतरांचा बळी देतात. अशा चुका कोणी दाखवून दिल्या तर त्यातील सत्यता स्वीकारावी. भावनेच्या भरात वाहून जाऊ नये.
नेताजींचा इतिहास देताना त्यांनी वेगळी चूल का मांडली, त्याला कोण कारणीभूत होते हे येणे अपरिहार्य आहे. गांधी प्रेमींनी सौम्य भूमिका घ्यावी, ही विनंती.

असो.