प्राणी हा शब्द रामदासस्वामींच्या काव्यात अनेकदा डोकावतो, त्यामुळे वरील श्लोकाचा कर्ता रामदासस्वामी असण्याची दाट शक्यता.

आणखी पहा:

शेत वाडे घर ठावो ।प्राणी जीवीं धरी हावो ॥

माता पिता बहिणी भ्राता । कन्या पुत्र आणि कांता ॥   

व्याही जावई आपुले । इष्ट मित्र सुखी केले ॥

दास म्हणे वो शेवटी । प्राप्त झाली मसण-वटी ॥

जन्मभरी शीण केला । अंत-काळीं व्यर्थ गेला ।।

काया स्मशानी घातली । कन्या पुत्र मुरडलीं

घर वाडा तो राहिला । प्राणि जातसे एकला ॥

धन धान्य तें राहिलें । प्राणी चर्फडित  गेले ॥

इष्ट मित्र आणि सांगाती । आपुलाले घरा जाती ॥

दास म्हणे प्राणी मेले । कांही पुण्य नाहीं केलें ॥

१:- परतलीं.