काही पुस्तके अशी असतात की कोणतही पान केव्हाही उघडावे आणि वाचायला सुरुवात करावी. वाचक तन्मयतेने पुस्तक वाचू लागतो. 'वनवास' हे पुस्तक त्यापैकी एक आहे. वनवास मधील काही सुरुवातीच्या कथांनंतर इतर कथा जवळ जवळ तीस वर्षांतर लिहिल्या आहेत. तरीही लंपनची ओढ वाचकांच्या मनात कायम राहते. तोच लंपन पुन्हा साकरण्यात ते यशस्वी झाले आहेत. बाबांच्या मित्रांचे वर्णन करणाऱ्या एका कथेत काही ओळी आहेत. (आदम नावाची कथा असावी चू. भू. द्या.. घ्या.)
कवी आगाऊ
आला पळुनी जाऊ!
हे लंपन प्रेमींना आठवत असेलच!