आपण सगळेच शिवाजीची वाट पाहत बसायला तयार आहोत. जन्मभर. पण शिवाजी होणार नाही. आम्ही शिव्या सगळ्यांना देवू. राजकारण्यांना देवू. पोलिसांना देवू, सरकारला देवू. पण आम्ही काय करू? भारतातून पळून जावू आणि परदेशात कायमचे राहू. आम्हाला आरक्षणे बोचतात. पण आपण असा विचार का नाही करत की आरक्षण नसलेल्या ५०% जागा होत्या, त्यात मी का स्थान मिळवू शकलो नाही? दुसऱ्याला काय मिळतंय हे बघण्यापेक्षा माला जे मिळतं त्याचा उपयोग मी का करू शकलो नाही? ह्याचा विचार आम्ही करतंच नाही. आम्ही आमच्या अपयशाला कारणं शोधतो. आरक्षण हे त्यातलंच एक.
एकूण काय? तर कशालातरी शिव्या द्यायच्या. परदेशातल्या सुधारणा म्हणा किंवा पद्धती म्हणा पाहून का आम्हाला असं वाटत नाही की हे आम्ही आमच्या देशात कसं करू. असे रस्ते आम्ही भारतात कसे बांधू? असे पोलिस भारतात कसे तयार होतील. लाचखोरी कशी कमी होईल? आम्ही फक्त धन्यता मानतो सत्य परिस्थितीपासून पळण्यात. आणि आम्ही म्हणजे त्यात मीही आलोच.
- कोहम