नाशिककर,
फूट निर्माण झालेली आहे. आपलं म्हणणं योग्य आहे की आरक्षणाचे निकष बदलणं आवष्यक आहे. आज ते जातीनिहाय आहे, उद्या कदाचित ते आर्थिक स्थितीनिहाय होऊ शकेल. पण जेव्हा मी आरक्षण हे माझ्या शैक्षणिक अपयशाचं कारण देतो तेव्हा मी हा विचार करायला हवा की उद्या आर्थिक निकषांवर आरक्षण मिळालं तरी माला मिळणार आहे का? नाही. मग इथून तिथून काय ५०% आरक्षण आहेच ना? माझ्यासाठी परिस्थिती तीच राहणार आहे. मग मी आरक्षण वाईट आणि तो माझ्यावर अन्याय आहे असं कसं म्हणू शकतो? हे माझ्या अपयशाचं कारण होवूच शकत नाही.
अर्थात हे व्यक्तिगत पातळीवरचं झालं. तुम्हाला जर खरोखरच कही मानवी हक्क निगडित सामाजिक कार्य करायचं असेल तर गोष्ट निराळी.
माझं म्हणणं एवढंच आहे की जे लोकं आरक्षणाच्या नावावर आपलं अपयश खपावतात, त्यातल्या बऱ्याचश्या लोकांना आरक्षणाचे निकष बदलल्याने काहीही फायदा होणार नाही. आणि तेव्हाही ते हे आरक्षाणाचंच कारण आपल्या अपयशासाठी देतील.
- कोहम