असा कांहीसा अनुभव मला आलेला आहे. पण तरीही मी त्यावर कांही प्रकट करणे नेहेमीच टाळत आलो. कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे हा विषयही टवाळीचा ठरतो. या चर्चेची सुरुवातही कांहीशी व्यंगात्मकच झालेली दिसते. भूत, भुताटकी हे वास्तव आहे की नाही हा खरा चर्चेचा विषय होऊ शकतो. माझ्यासारखे आणखीही कांहीजण यावर विश्वास ठेवत असतील तर तो विश्वास कदाचित्  अज्ञानमूलक असूंही शकतो. पण साधकबाधक चर्चेने त्याचे कांही निवारण होऊ शकले तर अशा चर्चेला अर्थ ठरेल. अन्यथा केवळ टवाळी हाच हेतू असेल तर त्यावर कांही न बोलणेच ठीक.