कुळकर्णीसाहेब परदेशात स्थाईक हा वैयक्तिक प्रश्न हे मान्य. भारताबद्दलच्या विशेष उल्लेखनीय बाबी पण छान पण जरा काही खटकले, ते का जरा माझ्या दृष्टिने बघावे ही विनंती
१) जगातली सर्वात मोठी लोकशाही येथे आहे. स्वतःच्या सेक्युलॅरिझमचा डंका पिटवणाऱ्यांना हे माहीतच असावे की, एका शीख व्यक्तीला एका कॅथलिक बाईने; मुस्लिम राष्ट्रपती मार्फत हिंदू बहुसंख्य असलेल्या देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ देववली आहे. इतर देशांच्या राष्ट्राध्यक्षांचे गोडवे काय वर्णावे.....
साहेब वेळ आली आहे की आपण सर्वांनी धर्म, जात ह्या गोष्टी शक्यतो सार्वजनीक ठीकाणी बोलणे सोडले पाहीजे, पण ते माझे मत... असो. माझे म्हणणे इतकेच आहे की डॉ. मनमोहनसिंग, डॉ. कलाम, यांचा त्यांच्या नावाने, विशेषता कतृत्वाने उल्लेख व्हावा. जातिने नव्हे. केवळ जातीधर्माच्या किंवा ओळखीच्या जोरावर ही पदे त्यांनी मिळवली हे असे त्यांचे विरोधकपण म्हणणार नाहीत.
२) महाजालासाठी सर्वात मोठी (रुंद) बँडविडथ वापरणारा देश.
जरा शंका आहे ह्या दाव्यावर, दुर करू शकाल?
३) सर्वात प्राचीन व सर्वप्रथम आधुनिक आयुर्विज्ञान प्रणाली, योगविद्या व विविध नॅचरोथेरेपीचा जनक देश.
पण स्वतंत्र भारतात अजुनही कायदे व मान्यता ऍलोपाथीच्याकडे झुकलेली...बऱ्याच आयुर्वेदीक औषधे निर्मात्यांनी त्यांच्या संघर्षाबद्दल हे सांगीतले आहे.
४) २५०च्या वर विद्यापीठे, १५०० संशोधन केंद्रे, ११००० उच्चविद्या शिक्षण केंद्रे व त्यातून बाहेर पडणारे २ लाख अभियंते व इतर ३ लाख टेक्निकल ग्रॅज्युएट्स.
काही मोजके सोडले तर ह्यातील कितिजण परदेशात सोडा पण भारतात ह्या शिक्षणावर चांगल्या ठीकाणी नोकऱ्या पटकवू शकतील हा मोठा प्रश्न आहे. तसेच यातील बऱ्याच संस्था ह्या निकृष्ठ व राजकारण्यांच्या सरकारी सवलती ओरबाडण्यासाठी आहेत.
५) जगातला सर्वात मोठा इंग्रजीचा वापर करणारा देश.
जरा बारकाईने विचार केला तर कळते, भारतातील सर्वांना नाही तर खूपच कमी लोकांना इंग्रजीचे ज्ञान आहे. तरीही आपण - जगातला सर्वात मोठा इंग्रजीचा वापर करणारा देश. म्हणजे काय भरमसाठ / बेसुमार लोकसंख्या असलेला देश म्हणायचा हा असा अर्थ निघू शकतो का? का इंग्लंड, अमेरीका, कॅनडा, ऑस्ट्रेलीया येथे लोकसंख्या नगण्य तरी शेवटच्या ३ देशांचा आकार आपल्यापेक्षा मोठा आहे ना.
६) जगातली ४थी मोठी अर्थव्यवस्था
हि देखील जेव्हा "खुली" झाली जागतीक अर्थव्यवस्थेशी बांधली गेली तेव्हा झाली.
७) तेथे आलेल्या नैसर्गिक आपत्तींत एकमेकांना मदत करण्याऐवजी लुटफाट केल्याचे ऐकीवात आहे (मुंबईत २६ व २७ जुलै २००५ ला एकमेकांना मदत केल्याचे लाखभर किस्से येथे आहेत !).
चांगली गोष्ट आहे. लुटफाट भारतात कधीच कुणीच केली नाही व करत नाही बरोबर? २६ व २७ जुलै ला कमी लुटफाट व जास्त मदत झाली ह्या बद्दल आनंद आहे पण गर्व नाही. तसेच माझी खात्री आहे की चांगल्या लोकांनी तिकडेपण नक्कीच मदत केली असणार जशी इकडे केली गेली.
काही गोष्टी भारतातही अभिमानास्पद आहेत हे मला मान्य पण त्यांचे एकंदरीत प्रमाण व अतिशय हळूहळू प्रगती एकदम खटकणाऱ्या आहेत. असो आशा आहे की हे चित्रपण बदलेल.
बाकि विश्वची माझे घर म्हणतात ना, मला तर वाटते की प्रत्येक भारतीयाला परदेशात जायची रहायची संधी मिळावी.