अशा संमेलनांची आपल्या देशात आवश्यकता आहे का? प्रतिज्ञा करताना, "सारे भारतीय माझे बांधव आहेत" , आणि इकडे ही असली संमेलने भरवायचे?
अशी संमेलने भरवल्याने आपण भारतीय नाहीत हे कसे सिद्ध होते? आणि न भरवल्याने भारतीयत्व कसे सिद्ध होते? मग "महाराष्ट्र मंडळे" सुद्धा "मराठीपणा" ची वेगळी भावना निर्माण करून भारतीयत्वा पासून दूर जात आहेत. आता ज्या प्रमाणे मराठी हि जात नाही आणि जीवन पद्धती/संस्कृती आहे, त्याच प्रमाणे अशी संमेलने हि "ठरावीक जीवन पद्धती/संस्कृती" मानणाऱ्या वर्गाची आहेत असे का समजू नये?
समजा या संमेलनाने चित्पावन लोक (किंवा वंश) अधिक हुशार आहे असे सिद्ध झाले म्हणजे मग काय होईल? त्याने काय फरक पडणार आहे?
जर सिद्ध करणारे तेच लोक असतील तर... कोणाला आणि काय फरक पडणार आहे हा प्रश्नच नाही
या असल्या संकुचित वृत्तीमुळे हिंदू धर्माचे अतोनात नुकसान झाले आहे.. इतिहासापासून आम्ही काहीच शिकणार नाही का?
नुकसान दुसऱ्याला कमी लेखण्याचा सर्वच सवर्णांच्या प्रवृत्तीने झाले, पण जर ही संमेलने त्या समाजाच्या सामुदायिक उन्नती/आढावा घेण्या साठी असतील तर ... (त्या संमेलनात असा काही आक्षेपार्ह मसुदा असले तर नक्कीच हे "भारता" साठी नुकसान कारक आहे.) आणि हो पण वरील प्रश्नातच याचे उत्तर आहे "चित्पावन लोक (किंवा वंश) अधिक हुशार आहे असे सिद्ध झाले म्हणजे मग काय होईल? त्याने काय फरक पडणार आहे?" जर काही फरक पडणार नाही असे वाटते तर नुकसानाचा प्रश्नच नाही...
अशा प्रकारच्या जातिनिहाय कार्यक्रमावर घटनेने बंदी आणायला हवी.
खरंय... दलित मेळावे (पोट जाती निहाय), चैत्यभूमीचा मेळावा, बाहुबलीचा अभिषेक मेळावा, ईसाई बंधूचे मेळावे, मुस्लिम बांधवांच्या सामुदायिक प्रार्थना/मेळावे हे बंद केले तर पोलिस यंत्रणेवरचा ताण किती कमी होईल? ते शांत संमेलने पण नको आणि दंगे पण नकोच. आणि हो "अमुक-अमुक जातीचा" विवाह मेळावा हे हि याच सदरात मोडतात...
आहो समाज बदलाला वेळ लागत असतो, "जातिनिहाय कार्यक्रमावर घटनेने बंदी" आणून किंवा "घटनेने जातिनिहाय राखिवजागा देऊन" चुटकी सारखा सुटणारा हा प्रश्न नाहीये.
अतिरेकी वाटेल, पण म्हातारी मेल्याचे दु:ख नाही हो, काळ सोकावतोय......!
म्हणजे नेमके कोण? अल्पसंख्याक सवर्ण ? जे स्वतः अस्तित्वासाठी धडपडताहेत ते?
जातीयवाद मानुच नये हे खरे पण आज-काल जातीयवाद मानु नका हे कुणाला सांगायचे ते एकदा रीवाइज (मराठि शब्द?) केले पाहिजे...
~(भारतीय) बंड्या