भास्कर जी, तुम्ही बरोबर लक्ष्य साधले आहे.
द्वारकानाथजीं चा मनोदय स्तुत्यच आहे. आणि माझा त्याला तत्वत: पाठिंबा पण आहे.

पण त्याबाबतित काहींचे जे सार्वजनिक गरळ ओकणे चालु आहे ते सर्वथ: निंदनिय आहे.

जेव्हा जेव्हा निरपराध भारतीयांचे अतिरेक्यांकडून बळी गेलेले पाहतो तेव्हा तेव्हा शाळेत रोज म्हणलेली प्रतिज्ञा आठवते...
"भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत..."
भारतातील काही लोक हे विसरलेले दिसतात. त्याना "फक्त पाकीस्तानी माझे बांधव आहेत, एव्हढेच म्हणायचे आहे." मोहनदास गांधीनी पण हिच चुक केली.  आता तरी जागे व्हा.

पाकीस्तान हा देश नाही, ती एक विचार प्रवृत्ती आहे. आणि त्या प्रवृत्तीने भारताचा नेहेमी विश्वासघातच केला आहे. हे आपण विसरता कामा नये. कारण जर का पाकीस्तानी सामान्य जनतेला भारताशी वैर नको आहे तरी पण भारद्वेष पेरणा-या नेत्यांना, राजकारणी आणि धार्मिक, का पाठिंबा देत आहेत?

जेव्हा ६ डिसेंबरला अयोध्येत रामंदिरासाठी जागा मोकळी केली, तेव्हा पाकीस्तान मधे क्रेनच्या सहाय्याने मंदिर पाडल्याचे स्पष्ट आठवते आहे. ते तिथल्या सामान्य लोकांनीच पाडले होते ना?

शिवसेनेच्या मुद्द्याबद्दल:
कुठल्याही भारतीय संघटनेने भारताचे हित बघणे काय चुकिचे आहे? उलट ते न बघणे जास्ती चुकिचे आहे.
भारतामधे जर का ८५% हिंदु आहेत, आणि जर का ते त्यांच्याच मातृभुमीमधे डावलले जात असतील, आणि त्याविरुद्ध कोणी आवाज उठवला तर त्यांचे वागणे चुक कसे?

स्वातंत्र्य मिळाल्याच्या अक्षरश: दुस-या दिवसापासुन पाकिस्तान घुसखोरी करत आहे. या गाडीमुळे तर राजरोस करेल!

दोन्ही देशांत शांतता निर्माण झालेली हवीच आहे. त्यासाठी अनेक त्याग़/तडजोडी पण लागणार आहेत. पण ते भारतीयांनीच का करावे, या साठी काही संघटना कार्यरत आहेत. आणि त्यांना कोणताही सुजाण आणि सुज्ञ भारतीय माझ्याप्रमाणे पाठिंबाच देईल.