वृकोदर,
मराठी साहित्यात द. मा. मिरासदार, शंकर पाटील, व्यंकटेश माडग़ूळकर आदिंनी 'गावाकडील गोष्टी' लिहीताना तेथील बोलीभाषेचा आपल्या लिखाणात सर्रास वापर केलेला आहे. अशी इतरही बर्‍याच लेखकांची उदाहरणे देता येतील. या 'अशुद्ध' लेखनाने मराठीचा अपमान होतो असे तुम्हाला खरेच वाटते का ?

बहिणाबाईंच्या, मराठी शुद्धलेखनाचे नियम न पाळणार्‍या ओव्या मराठीला समृद्धच करत नाहीत का ?

त्यामुळे मला वाटते कि एखादी म्हण जर खरोखरच बोलीभाषेत असेल तर ती तशीच लिहायला हरकत नाही; पण सर्वसाधारण लिखाण करताना अर्थातच शुद्धलेखनाचे नियम पाळावेत.

btw, वि. कृ. श्रोत्रिय यांनी संकलित केलेल्या संस्कृत सुभाषितांच्या एका पुस्तकात त्यांनी लिहीले आहे की, ती म्हण खरी 'अडला हरी गरुडाचे पाय धरी' अशी होती, पण कालौघात गरुडाचे गाढव झाले. :)