>>यावर सगळ्यात कडी म्हणजे परदेशातुन गावाला परत गेल्यावर जवळच्या प्रत्येकाला काही भेट दिल्यावर (हे काय , एवढच ?) चेहऱ्यावरचे प्रतिसाद.<<

जरा सापेक्ष आहे. तुम्ही नक्की काय देताय ते समजून घ्यावे लागेल (जरा भारी माल काढा की राव) जे विनम्रपणे सांगू इच्छीतो. ह. घ्या. :-)

गिफ़्टस च्याबाबतीत म्हणाल तर हल्ली भारतात बरेच काही चांगले मिळते. तसेच पूर्वी कोणीतरी एकच नातेवाईक परदेशी असायचा, आता जास्त परदेशी नातेवाइक असतात, कदाचीत त्या दुसऱ्याने चांगले दिले असेल की त्यापूढे...

बाकी आपलीजिवाभावाची माणसे प्रत्यक्षात तेवढी भेटत नाहीत हे सोडले तर बाकी सगळे गौण. परदेशात रहाण्याचे फ़ायदे अनेक आहेत. त्यापूढे भांडी स्वतः धुवावी लागणे,  "इस्त्रीवाला" होणे इज नथींग. जरा बक्कळ कमवत असाल तर तुम्हाला काही स्वतःला सोडून इकडचे तिकडे करावे लागत नाही.

परदेशातील पहीला सांस्कृतिक धक्का हा की रस्त्यावर वाहन चालवत आहे म्हणून कोणी हॉर्न वाजवत नाही. आख्या दिवसात एकदाही गाडीचा हॉर्न ऐकू आला नाही. असे जागृत अवस्थेतील भारतातील दिवस सांगा (व श्री. विनम्र यांनी निवडलेले गिफ़्ट घेऊन जा  )